16 जुलै, शनिवार संकष्टी चतुर्थी फक्त 2 दुर्वा अशा करा अर्पण इच्छा नक्की होईल पूर्ण….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ओम गं गणपतये नमः, 16 जुलै शनिवारचा दिवस या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. या संकष्टी चतुर्थी आपण गणपती बाप्पांची आवश्यकता पुजा अवश्य करा आणि सोबतच एक छोटासा उपाय आहे.

हा उपाय सुद्धा आपल्या मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपण आवर्जून करावा. हा उपाय आपल्या मनातील ज्या काही इच्छा अनेक दिवसांपासून अपूर्ण आहेत, त्या इच्छाची पूर्तता करतो.

मात्र लक्षात ठेवा एका इच्छेसाठीच आपण हा उपाय करायचा आहे. एकाच वेळी एकापेक्षा जास्त इच्छा या ठिकाणी बोलू नका. हा उपाय करण्यासाठी आपणास दोन दुर्वा लागणार आहेत.

दुवा म्हणजे असं गवत जे 21 काड्यांच्या स्वरूपात आपण गणपती बाप्पा अर्पण करतो, कारण भगवान श्रीगणेशांना दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. आपण 21 दुर्वा घेऊन त्या गणपती बाप्पांना अर्पण करत असतो.

तर आज आपण गणपती बाप्पांचा पूजन करताना दुर्वा तर अर्पण करायच्या आहेत मात्र सोबतच 2 दुर्वा घेवून या दुर्वांमध्ये त्याला जे गवताचे पाते असते त्या पात्याला 1-1 गाठी मारायच्या आहेत.

मात्र त्यावेळी आपली इच्छा बोलायची आहे. तुमची काय इच्छा आहे, मनोकामना आहे आपण गणपती बाप्पांचा पूजन करा आणि या दुर्वांमध्ये “ओम गं गणपतये नमः”,”ओम गं गणपतये नमः “ किंवा तुम्हाला गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो.

त्या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन आपण हा उपाय करायचा आहे आणि प्रार्थना करायचे आहे की, आपल्या मनातील ईच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावे.

जर तुमच्या मनात एकापेक्षा जास्त इच्छा असल्यास तर आपण पुढील संकष्टी चतुर्थीला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय होऊ शकतो. मग अशा प्रकारे 2 गाठ या दूर्वाना मारल्यानंतर या दोन्ही दुर्वा आपण गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची आहेत.

आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण या दोन्ही दुर्वा एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत. ते आपल्या घरात ठेवण्याची गरज नाही.

मित्रांनो असा हा छोटासा उपाय जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचं करते गणपती बाप्पाच्या व्यक्तीच्या मनातील इच्छांची पूर्तता नक्की करतात. मात्र या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की, या दिवशी मांसाहार करणे किंवा व्यसन करण यापासून आपण दूर राहा.

आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचा कोणत्याही मंत्रांचा सातत्याने जप होत राहील मग आपण आपला मोबाईल वापरू शकता किंवा टीव्हीवर ती मोबाईलवर असेल त्यावर आपण गणपती बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचा जप कोणताही मंत्र आपण लावून ठेवू शकता.

जेणेकरून घरामध्ये वातावरण प्रसन्न राहील, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि उपाय करणार करणार आहात तो उपाय करण्यासाठी एक सुंदर आणि पवित्र अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी क्रिएट होईल.

मित्रांनो सांगण्याचा उद्देश हाच आहे की, कोणताही उपाय करताना पवित्रता आणि एक प्रकारची ऊर्जा आवश्यक असते. ही ऊर्जा निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करा.

याशिवाय, आपल्या मुख्य दरवाज्याची सजावट आणि घराची साफसफाई करा आणि आंब्याच्या पानांचे तोरण आपण आपल्या मुख्य चौकट आहे त्या ठिकाणी लावा.

दरवाजावर ती स्वस्तिक काढणे किंवा ओम काढणं शुभ लाभ दोन्ही बाजूंना ह्यासारख्या शुभ आणि सकारात्मक गोष्टी आपण करायचे आहेत. रात्रीच्या वेळी उंबरठ्यावरती एक तुपाचा दिवा पण प्रज्वलित करा.

माता तुळशीसमोर दिवा पण रात्री लावायचा आहे आणि जे लोक रात्रीच्या वेळी गणपती बाप्पा आणि उपवास सोडतात त्या लोकांनी लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थितीत संकष्टीचा उपवास हा रात्रीस सोडायचा असतो.

तो उपवास रात्रभर ठेवण्याची गरज नाही अशी चूक करू नका. आपण एवढे त्यामुळे प्राप्त होत नाही तर मित्रांनो संकष्टी चतुर्थीचा हा उपाय अशाप्रकारे आपण नक्की करा.
गणपती बाप्पा आपल्या मनातील इच्छांची पूर्तता नक्की करून याच मनोकामना पूर्ण करतील.. धन्यवाद ओम नमो नारायणा

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!