आषाढी एकादशीला करा ही 1 सेवा, , संपूर्ण व्रताच फळ मिळे ल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, एकादशी उपवास हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी 24 एकादशी असतात. आषाढ मास पक्षातील च्या एकादशी फक्त “देवशयनी एकादशी”असे म्हणतात.

काही ठिकाणी या तारखेला ‘पद्मनाभ’ असेही म्हणतात. जेव्हा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करते तेव्हा ही एकादशी येते. चातुर्मास ही या दिवसाची सुरुवात मानली जाते. या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरात झोपले आहेत

आणि मग सूर्य तुला मध्ये जात असताना सुमारे चार महिन्यांनंतर तो उठविला जातो. त्या दिवसाला देवोत्थान एकादशी म्हणतात. या अंतराला चातुर्मास म्हणतात.

या वर्षी ही एकादशी 20 जुलै या दिवशी मंगळवारच्या दिवशी आली आहे.म्हणून वर्षभरात येत असलेल्या सर्व एकादशी मध्ये या आषाढी एकादशीला विशेष महत्त्व असते. कारण आहे या दिवसापासूनच श्रीविष्णू हे योगनिद्रेत जातात,म्हणून या दिवसापासूनच चातुर्मासाचा प्रारंभ होतो.

या दिवसापासून चार महिन्यापर्यंत श्रीविष्णू योगनिद्रा मध्ये असतात. याशिवाय देव-उठणी एकादशीला श्रीविष्णू योग्य निद्रेतून जागे होतात,असा उल्लेख पोथी पुराणात दिला आहे.म्हणून तेंव्हाच चातुर्मासाची समाप्ती होते.

या आषाढी एकादशी निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला चालत जाण्याची ,पौराणिक प्रथा महाराष्ट्रत आहे. याला “वारी” असे म्हणतात. हे सर्व भाविक लाखोंच्या संख्येने एकादशीच्या दिवशी श्री विष्णूच्या विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतात,

याशिवाय चंद्रभागेमध्ये स्नान करतात.कारण या दिवशी चंद्रभागा नदीमध्ये स्नान केल्याचे ही खूप महत्त्व सांगितले जाते. या दिवशी जर आपण चंद्रभागेमध्ये स्नान केले तर, आपल्या सर्व पापांचा नाश होतो. सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती प्राप्त होते.

परंतु सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाच्या संकटामुळे नदीमध्ये स्नान करणे शक्य नाही. तर अशा वेळी नदी स्नानामुळे जे आपल्याला पुण्य मिळणार आहे, तेच पुण्य आपण घरच्या या एका उपायाने मिळवू शकतो, यासाठी हा उपाय नक्की केला पाहिजे.

या पवित्र आणि अत्यंत महत्त्वाच्या उपायासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकल्यास ,त्यामुळे आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते.

तर हा उपाय करण्यासाठी ,आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून ,आंघोळ करायची आहे. तसेच हे गंगाजल आपल्याला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल.

तरी या गंगाजलाचे काही थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करावी. याशिवाय ही आंघोळ करताना आपल्याला एक श्लोक म्हणायचे आहे.
।।”गंगे च यमुने चैव गोदावरी, सरस्वती , नर्मदे ,सिंधू ,कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु।।

या नद्यांचे नावाचे उच्चारण आपल्याला अंघोळ करताना करावे. यामुळे आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल.म्हणून हा पुण्य प्राप्त करण्यासाठी हा उपाय नक्की करावा. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!