ज्योतिषीनुसार, या 3 राशीच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये नाहीतर होईल अनर्थ..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवत असते, कारण ग्रहनक्षत्रात होणारे बदल जेव्हा अशुभ किंवा नकारात्मक असतात,

तेव्हा आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नक्षत्र जेव्हा प्रतिकूल किंवा वाईट असतात, तेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही.

विश्वातील प्रत्येक गोष्टीचा संबंध नवग्रहांशी येतो.आणि तो तसाच ईश्वराशी सुद्धा येतो. मित्रांनो जर आपण चांदीच्या वस्तू वापरत असाल तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवा चांदीवरती शुक्र आणि चंद्र यांचा प्रभाव असतो.

चांदीवरती शुक्र आणि चंद्र यांचा प्रभाव असतो आणि म्हणून ज्या लोकांना अतिशय राग येतो जे लोक शिग्रकोपी असतात म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टींवर ज्यांना पटकन आणि जास्त राग येतो अशा लोकांनी चांदीची अंगठी अवश्य घालावी.

असे लोक चांदीच्या अंगठी सोबतच चांदीची चैन सुद्धा गळ्यामध्ये घालू शकतात. अशी हि चांदीची अंगठी किंवा चैन घातल्याने या लोकांना रागावर नियंत्रण मिळवता येईल. कारण शुक्र आणि चंद्र हे शीतल असतात.

गारवा आणि थंडाई निर्माण करण्याच काम हे करत असतात. आणि म्हणूनच तुमच्या शिग्रकोपी स्वभावावर हे शुक्र आणि चंद्र नियंत्र ठेवतात आणि तुमच जीवन सुखमय बनवतात.

चांदीची अंगठी वापरल्याने अनेक सकारात्मक फायदे होतात. मात्र अश्या 3 राशी आहेत ज्यांनी चांदीची अंगठी घातल्याने त्यांच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडतात.

जर तुमची रास मेष असेल तर आपण चुकूनही चांदीची अंगठी घालू नका. याच कारण चांदीची अंगठी घातल्याने आपल्या जीवनातून सुख आणि शांती निघून जाईल. समृद्धी, ऐश्वर्य आणि पैसा आपल्या घरामध्ये टिकणार नाही.

चांदीची अंगठी घालणे हे मेष राशी साठी अतिशय अशुभ मानले गेले आहे. सोबतच ज्योतिष शास्त्र असे सांगते कि चांदीच्या अंगठी सोबतच चांदीचा ग्लास देखील वापरू नका. हि अंगठी आणि ग्लास या दोन गोष्टी आपल्यासाठी अशुभ आहेत.

जर आपली रास धनु असेल तर ज्योतिष शास्त्रा नुसार आपण चांदीची अंगठी घालण्यास अतिशय अशुभ मानले गेले आहे. असं म्हणतात कि धनु राशीच्या लोकांनी चुकून जरी चांदीची अंगठी घातली.

तर या लोकांना मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागते. तुमच्या जीवनामध्ये अश्या अनेक प्रकारच्या समस्या येतात कि ज्यामुळे तुम्ही हैराण होऊन जाल आणि म्हणून ज्योतिष शास्त्राचं जर तुम्ही ऐकाल तर धनुराशीच्या लोकांनी सुद्धा चांदीची अंगठी घालू नये.

सिंह राशीच्या लोकांनी जर चांदीची अंगठी घातली तर त्यांना उद्योग व्यवसायात खूप मोठं नुकसान सहन करावं लागत.

या राशीच्या लोकांनी जर चांदीची अंगठी घातली तर त्यांची अर्थी स्थिती हळू हळू डबघाईला येते. मात्र हि गोष्ट त्यांना थेट कळत नाही. अतिशय सावकाश त्यांच्याच संपत्ती मध्ये कमतरता येऊ लागते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!