श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र तोडण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, नाहीतर…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्रावण महिना आला की प्रत्येकजण शिवशंभोची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो. श्रावण महिन्यात केलेली पूजा तत्काळ मान्य होते.शिवशंभो महादेव त्या व्यक्ती वर तात्काळ प्रसन्न होतात. शिवशंभो ची पूजा आराधना करताना शिवलिंगा वरती प्रत्येकजण बेलपत्र अवश्य चडवतो.

बेलपत्र म्हणजे बेलाच्या झाडाची पानं. हिंदू धर्म शास्त्रानुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने शिवशभोंची कृपा शीघ्र प्राप्त होते. मात्र हे बेलपत्र कास अर्पण कराव आणि बेलपत्र कसा तोडाव हे बऱ्याच जणांना माहिती नसत.

आणि म्हणूनच काही वेळा बेलपत्र तोडताना आणि ते अर्पण करताना नकळत पणे चूक होते आणि ती पूजा व्यर्थ जाते. पूजेचं जस फळं मिळायला पाहिजे तस मिळत नाही.
बेलपत्राला बिल्वपत्र असे संस्कृत मधे नाव आहे.

भगवान शिवशंकरांना बिल्वपत्र अत्यंत प्रिय आहेत. असे म्हणतात की जी व्यकी शिवलिंगावर मनोभावे बेलपत्र आणि जल अर्पण करते त्या व्यक्तीच्या मनातली इच्छा भगवान शिवशनकऱ्य पूर्ण करतात.

कारण हे बेलपत्र भगवान शिवशंकरांच मस्तिष्क शितल ठेवण्याचं काम करतं. बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहेत. पहिला महत्वाचा नियम चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्य या तिथींना कधीही बेलपत्र तोडू नये.

ज्यादिवशी संक्रांत असेल आणि सोमवार असेल त्यादिवशी बेलपत्र तोडू नये.सोमवारी सुद्धा बेलपत्र तोडण्यास हिंदू धर्मशस्त्राप्रमाणे परवानगी नाही. या तिथी सोडून इतर तिथींना कधीही बेलपत्र तोडू शकता.

बेलपत्र कधीही शिळी होतं नाही त्याना वारंवार धुवून पुन्हा वापरू शकतो. काल तोडलेल बेलपत्र आजही वापरू शकतो. पण वरील सांगितलेल्या तिथींना चुकून ही बेलपत्र तोडू नका.

जर बेलपत्र नसेल तर दुसऱ्यांनी शिवलिंगावर वाहीलेल बेलपत्र धुवून घेऊन आपण ते स्वतः वापरू शकता.यामधे कोणतीही गोष्ट वर्ज नाहीये. स्कंदपुरणामधे उलेक्क आढळतो. “अर्पितान्यापीबिल्वाणी प्रक्षहल्यापी पुना पून: शंखरार्यापणी यानी न नवाणी यदीक्वचित” याचा अर्थ बेलपत्र कधीही शिळे होता नाहीत आणि दुसऱ्यांनी अर्पण केलेले बेलपत्र आपण सुद्धा अर्पण करू शकतो.

याला धर्माचा आधार आहे. जेव्हा तुम्ही बेलपत्र तोडायला जाल तेव्हा आपण एक एक बेलपत्र तोडायच आहे संपूर्ण फांदी तोडू नये.या बेलाच्या झाडास कोणतंही नुकसान होणार नाही ,कोणतीही हानी पोहचणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे.

आणि महत्वाची गोष्ट बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि तोडून झाल्यानंतर त्या बेलाच्या वृक्षास मनोमन प्रणाम करायचं आहे. आता जेव्हा बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहे तेव्हा ते उलटे अर्पण करावे आणि असे बेलपत्र चुकूनही अर्पण करू नका ज्यामधे चक्र आणि वज्र आहे.

बेल पत्र तीन पानांपासून ते अकरा पांनापर्यंत असतात त्याला दल असे म्हणतात. जितकी जास्त दल तितकं ते बेलपत्र उत्तम मानलं जातं. आणि जर तुम्हाला जास्त दलनाच बेलपत्र मिळालं तर ते शिवशंभूना अवश्य अर्पण करा तुमच्यावर शिवशंभूची कृपा खूप लवकर बसेल.

बेलाची वृक्ष खूप उंच आहे जे तुम्हाला तोडता येत नाहीये तर अश्यावेळी दुरूनच आपण त्या झाडाचं दर्शन घ्यावं यासाठी त्या झाडाला हानी पोहचवण्याची गरज नाही. दुरूनच त्या वृक्षाच दर्शन घ्यावं आणि आपल्याकडून झालेले सर्व पाप ताप नष्ट होऊन जातात.

शिवलिंगावर एखाद्या व्यक्तिने बेलपत्र अर्पण केलेले असेल त्या बेलपत्राची उपेक्षा आपल्याकडून होऊ नये. त्या बेलपत्तत्राला आपण नवे ठेवू नयेत. ते बेलपत्र कोणीही अर्पण करुद्या ते बेलपत्र तितकचमहत्वाचं आहे तितकंच पवित्र आहे.

जितकं ते आपण अर्पण करणार असलेलं बेलपत्र असेल म्हणून दुसऱ्यांनी अर्पण केलेल्या बेलपत्राची उपेक्षा होणार नाही याची आपण काळजी घ्यायचीअशाप्रकारे जर बेलपत्र तोंडून अर्पण केला तर स्कंद पुराणानुसार आपल्या मनातल्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात.

शिवलिंगावर एखाद्या व्यक्तिने बेलपत्र अर्पण केलेले असेल त्या बेलपत्राची उपेक्षा आपल्याकडून होऊ नये. त्या बेलपत्तत्राला आपण नवे ठेवू नयेत. ते बेलपत्र कोणीही अर्पण करुद्या ते बेलपत्र तितकचमहत्वाचं आहे तितकंच पवित्र आहे.

जितकं ते आपण अर्पण करणार असलेलं बेलपत्र असेल म्हणून दुसऱ्यांनी अर्पण केलेल्या बेलपत्राची उपेक्षा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची अशा प्रकारे जर बेलपत्र तोंडून अर्पण केला तर स्कंद पुराणानुसार आपल्या मनातल्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!