किचनमधे अजिबात ठेवू नका या वस्तू, नाहीतर घरात वाद विवाद होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरात सुख आणि शांती हवी असते. सर्वजण घरात वाद आणि संघर्ष होऊ नये, यासाठी प्रयत्न करतात. परंतु वाद होणे स्वाभाविक आहे आणि कधीकधी ते मोठे होतात.

यामुळे घराचे वातावरण बिघडते आणि सुख आणि शांतता विस्कळीत होते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की कधीकधी वास्तु देखील घरातील समस्यांचे कारण बनू शकते. वास्तुनुसार स्वयंपाकघरात केलेल्या काही चुका घरात अशांतता निर्माण करू शकतात.

यामुळे केवळ घराचीच शांतता भंग होत नाही तर कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

घरात शांतता राखण्यासाठी स्वयंपाकघरात कोणत्या गोष्टी ठेवू नयेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.याचबरोबर, किचन म्हणजे जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो असे ठिकाण पण कधी कधी किचनमध्ये आपल्याकडून काही चुका होत असतात, ज्या चुका झाल्यामुळे घरात आणि किचनमध्ये नकारात्मकता निर्माण होत असते,.

आणि ती नकारात्मकता जेवणामधून आपल्या शरीरात प्रवेश करते. काही चुका होऊ नयेत म्हणून आपण आपल्या स्वयंपाक घरात विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण कोणत्याही प्रकारची चूक आपल्या हातून होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते.

तर चला जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या वस्तु ज्या किचनमध्ये ठेवू नयेत.

1.देवघर : काही घरांमध्ये स्वयंपाकघरात देवघर बनवले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की स्वयंपाकघर हे आई अन्नपूर्णा यांचे स्थान आहे आणि अग्नि देव देखील येथे निवास करतात.

परंतु वास्तुनुसार स्वयंपाकघरात कधीही मंदिर बांधू नये. कारण स्वयंपाकघरात सात्विक आणि तामसिक अन्न दोन्ही शिजतात. या अन्नात कांदा आणि लसूण यांचाही समावेश असतो.

त्यामुळे स्वयंपाकघरात मंदिर असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. तसेच कारण किचनमध्ये भरपूर गोष्टी केल्या जातात ज्याने देवांना तिथे त्रास होऊ शकतो. तुमच्याकडे घरात जागाच नसेल आणि फक्त किचनमध्येच जागा असेल तर तुम्ही देवघराला पडदा किंवा दरवाजा लावून घ्यावा. देवघर किचनमध्ये उघडयावर देवघर करू नये.

2.कचऱ्याचा डबा: मित्रानो कचऱ्याचा डबा कधीच किचनमध्ये ठेवू नका, याने खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता निर्माण होते. अशामुळे घरात वाद-विवाद होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही किंवा घरांत वारंवार खटके उडत असतात. मग परिणामी नात्यात दरी निर्माण होते.

3. तुटलेली आणि फुटलेली भांडी: अनेकदा काम करत असताना भांड्याला थोडासा तडा जातो आणि असे असूनही तुम्ही ते वापरता. परंतु वास्तूनुसार तुटलेली आणि फुटलेली भांडी ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते.

आणि घरातील प्रमुखाच्या डोक्यावर कर्ज वाढते. तसेच सदस्यांमध्ये परस्पर मतभेद देखील वाढतात.

4. मळलेले शिळे पीठ: अनेक वेळा लोक उरलेले मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर ते वापरतात. हे वास्तुशास्त्रानुसार अजिबात बरोबर नाही. असे करणे केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही तर त्याचा शनी आणि राहूवरही नकारात्मक परिणाम होतो. शास्त्रानुसार मळलेले पीठ ठेवणे चुकीचे मानले जाते.

5. बाथरूम: वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे म्हणजे, टॉयलेट किया बाथरूम चुकूनही किचनमध्ये नसावे किंवा त्याचे दरवाजे किचनच्या दिशेने उपडता कामा नये. तुमच्या घरात सुद्धा अशी परिस्थिती असेल तर ताबडतोब याच्यात बदल करा.

तसेच वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत, ज्यामध्ये तुटकी फुटकी भाडी किंवा जुने भंगार जर तुमच्या किचनमध्ये असेल किंवा गॅसच्या खाली म्हणा, गाळ्यावर असेल तर तो सुद्धा तुम्ही तिथून दूर करा.

कारण याने सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात निर्माण होते. याचबरोबर, बरेच लोक स्वयंपाकघरात औषधी ठेवतात जे चुकीचे आहे. वास्तु- शास्त्रानुसार औषध कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये.

असे केल्याने आजार वाढण्याची शक्यता असते असे मानले जाते. खराब आरोग्यामुळे उपचारांमध्ये बराच पैसा खर्च होतो. यामुळे घरात आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

याशिवाय, झाड़ू सुद्धा किचन मध्ये ठेवू नये, असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होत असते. घरात प्रसन्न असणारी लक्ष्मी तात्काळ घर सोडून निघून जाते. या बारीक बारीक गोष्टींची लक्षपूर्वक काळजी घेणे जरुरी आहे.

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात शूज आणि चप्पल घालून गेल्याने नकारात्मक परिणाम होतो. यामुळे घाण आणि जंतू स्वयंपाकघरात पोहोचतात. एवढेच नाही तर आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरात निवास करते आणि शूज किंवा चप्पल घालून स्वयंपाक घरात गेल्यास तिचा अपमान होतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!