नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, अनेकदा आपल्या वास्तूला किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला कुणाची तरी नजर लागते किंवा कधी कधी कुणी तरी ज्याला आपली प्रगती आपलं सुख होत नाहीये,त्या व्यक्ती आपल्यावर ती काहीतरी नकारात्मक शक्ती पाठवतात.
मग अशावेळी आपल्या घरात अनेक समस्या निर्माण होतात, अनेक प्रकारचे नुकसान होतं. कारण हीच नकारात्मक ऊर्जा कळत-नकळत आपल्यापर्यंत आलेली असते. त्यामुळे घरात कलह निर्माण होतात, चालू कामे बंद पडतात.
याचबरोबर जे काही पैसा कमावण्याचं साधन आहे, ही कामे ठप्प होतात. घरांमध्ये लोक वारंवार आजारी पडून रोगी बनतात आणि पैसा टिकत नाही, अशा ठिकाणी लक्ष्मी सुद्धा राहत नाही.
अशा वेळी नक्की आपल्या घराला वास्तुला किंवा लोकांना नजर लागलेली नाही ना, हे ओळखण्यासाठी तंत्र शास्त्रात काही प्रयोग सांगितलेले आहेत आणि या गोष्टींवर विश्वास बसत नाही. मग अश्यावेळी आपण एक तुरटीचा टोटका नक्कीच केला पाहिजे..
तुरटीचे जसे आपले सौंदर्य, त्वचा, दात, केस आपला चेहरा ह्या साठी जशी फायदेशीर आहे. तसेच तुरटीच्या टोटका केल्याने आपल्याला अपार धनप्राप्ती, कर्जापासून मुक्ती, घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, वाईट नजर, विचित्र स्वप्न व घरातील भांडण दूर करते.
तुरटीचा हा टोटका अगदी सोपा व सरळ आहे. याचा उपायाचा अवलंब करून ,आपले जीवन सुखी व समृद्ध होऊ शकते.त्यामुळे आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता असते.
त्यामुळे हा उपाय पूर्ण विश्वासपूर्वक केल्यास कोणतेही काम पूर्ण होते व उपाय याचा निश्चितच आपल्याला फायदा मिळतो.
तुरटीचा वापर आपण फार पूर्वीपासून आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. तुरटीचा वापर आपण साधारपणे पाणी स्वच्छ करण्यासाठी करत असतो किंवा काही लागल्यास किंवा काही मार लागला तर त्याठिकाणी तुरटीची पावडर ,
पाणी लावून ती जखम धुतली जाते.याशिवाय आपण या तुरटीचा आपल्या जीवनात धनलाभ किंवा दरिद्री नष्ट होण्यासाठी करणार आहोत. जर आपल्या कष्टाचे म्हणावे तितके फळ मिळत नसेल किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसल्यास,
तसेच आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी किंवा घरातील प्रत्येक खोलीत 1 छोटीचा तुकडा ठेवल्यास, त्या ठिकाणचा वास्तू दोष निघून जातो.
परिणामी यामुळे कामातील अडथळे दूर होतील. तसेच तुमची प्रगती होईल व तुमच्या सर्व कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. याशिवाय आपल्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल, तर एका काळ्या कापडात हा तुरटीचा 1 तुकडा बांधून,
आपल्या दुकानाच्या किंवा घराच्या पुढे मुख्य दाराच्या वरच्या बाजूला लावून द्यावे. असे केल्याने वास्तूदोष दूर होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.तसेच तुमच्या व्यवसायात वृद्धी व्हायला सुरुवात होते. परिणामी आपल्या पैशांची आवक वाढते.
तसेच आपल्यावर खूप कर्ज असल्यास किंवा काही केल्याचे कमी होत नसल्यास यासाठी एका विड्याचे पान घेऊन त्यामध्ये कुंकुुं टाकावे व त्यात एक छोटासा तुरटीचा तुकडा टाकून ते पान लाल रंगाच्या दोर्याने बांधून,
पिंपळाच्या झाडाखाली पुरून टाकावे. या उपायामुळे थोड्याच दिवसात तुम्हाला करता पासून मुक्तता मिळेल. थोडे-थोडे करत करत आपले सर्व कर्ज कमी होईल आणि तो दिवसांत तुम्ही कर्ज मुक्त होण्यास मदत होईल.
या चमत्कारी उपायांचा अगदी पूर्ण विश्वासाने अवलंब केल्यास, तुमच्या आर्थिक समस्येपासून सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न होऊन तिचा वास कायम तुमच्या घरात राहील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments