नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,जीवनाशी संबंधित सर्व सुखांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असते. ज्यासाठी माणूस दिवस-रात्र मेहनत करतो. दिवाळी हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि संपत्तीचे देवता कुबेर यांचे आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात मोठा दिवस असतो.
या दिवशी लोक सुख आणि समृद्धीच्या इच्छेसाठी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विधीवत पूजा करतात. ही चमत्कारिक वस्तू म्हणजे तांदूळ होय..
जी तांदूळ आपण देवीच्या ओटी भरण्यास आणि लक्ष्मीच्या पूजनात फार महत्व आहे. तांदूळात इतके सामर्थ्य असते की तट धनप्राप्ती करण्यासाठी वरदान ठरतात तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी देखील यांचं महत्व खूप आहे.
तांदूळाच्या उपायांनी धन कसे मिळवायचे याबद्दल तुम्ही जर जाणून घेतलं तर तुमच्या जीवनात धनाची कमतरता भासणार नाही.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या पुजना बरोबरच 11 सिद्ध तांदूळाचे पूजन करावे आणि या तांदूळाना पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्यावे.
हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपली तिजोरी नेहमी पैशांनी भरून राहते. आपल्या घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दारावर 11 सिद्ध तांदूळाची लाल कापडात बांधून ती गाठोडी लटकावून द्यावी.
असे केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते व त्याबरोबर आपल्या घरात कोणतीही नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. जर वाईट नजरेपासून आपला बचाव करायचा असेल.
तर तांदूळात काळ्या दोऱ्यात टाकून गळ्यात धारण करावे असे केल्याने कोणतेही वाईट नजर आपल्याला स्पर्शही करू शकत नाही.
याचबरोबर, शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी काही खास उपाय करून आपण देवी आईला प्रसन्ना करू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी पिवळ्या कवड्या तोटका खूपच प्रभावी सिद्ध शकतो.
ज्योतिष शास्त्रानुसार कवडीने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. शुक्रवारी पिवळ्या कापडात 11 सिद्ध कवड्या, थोडेसे केसर आणि चांदीचे एक नाणे घेऊन त्याची गाठोडे तयार करावी, ही गाठोडी देवी लक्ष्मी चरणांना लावून आपल्या तिजोरीत ठेवून द्यावी . त्यामुळे आपल्या धनात वृद्धी होते.
शुक्रवारी गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ असते. यामध्ये आपण पांढरे वस्त्र, तांदूळ, पीठ, साखर किंवा इतर कोणतीही पांढरी वस्तू दान करू शकतो. ज्या व्यक्तीने आपली मनोकामना पूर्ण करायचे असेल.
त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी तीन किंवा पाच कन्याना घरी बोलावून त्यांना खीर खायला द्यावी. यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आपल्याला घरात सुख व समाधान मिळवायचे असेल तर देवी लक्ष्मी समोर 11 पांढऱ्या कवड्या ठेवून तेथे तुपाचा दिवा लावावा.
त्याबरोबरच दिव्यात 1-2 केशराच्या काड्या टाकाव्यात, यामुळे घरात धनधान्य वृद्धी होते. माता लक्ष्मी ही श्रीहरी विष्णू ची पत्नी असल्याने शुक्रवारी श्रीहरी चे पूजन केल्याने हे आपल्यावर देवी प्रसन्न होते.
शास्त्रानुसार श्रीहरी विष्णूना दक्षिणावर्ती शंख पाणी भरून त्या पाण्याने अभिषेक केल्यास त्यांची आपल्यावर कृपा होते. जर आपले कोणतेही काम होत नसेल , प्रत्येक कामात काही ना काही बाधा येत असेल.
तर शुक्रवारी चार मुखी दिवा लावावा, त्यात लाल वाती लावाव्यात व हा दिवा देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू समोर लावा. यामुळे आपली अडलेली कामे मार्गी लागतात व पतीला दीर्घ आयुष्याचे प्राप्ती होण्यासाठी ,सुख धन मिळवण्यासाठी शुक्रवारी सौभाग्याचे सामान दान करावे.
यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. जर आपल्याला नोकरी लागत नसेल तर शुक्रवारी सिद्ध 21 कवड्या नवीन पिवळ्या वस्त्रात ठेवून देवी लक्ष्मीच्या कोणत्याही सिद्ध मंत्र 108 वेळा जप करून लाल रंगाचे गुलाबाचे फुल अर्पण करावे.
नंतर त्या फुलाला आपल्याजवळ ठेवावे आणि इंटरव्ह्यूला जाताना आपल्या खिशात पर्स किंवा पाकिटात घेऊन त्यामुळे आपले काम लवकरच होईल व नोकरी लागेल . शुक्रवारी कोणतेही तांब्याच्या पात्रात 11 कवड्या व देवी लक्ष्मी चे प्रिय श्रीयंत्र ठेवून देवघरात ठेवावे,
स्वस्तिक बनवावे त्यानंतर यथाशक्ती पूजन करून देवीकडे प्रार्थना करावी हे देवी आई तुझ्या सर्व भक्तांवर तुझे छाया असुदे, यानंतर श्री यंत्र आपल्या पर्स मध्ये ठेवावे आणि त्या कवड्याना कोणत्याही लाल कापडात बांधून ठेवून , असे केल्याने पर्स किंवा पाकीट पैशाने भरलेला राहिल.
शुक्रवारी संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे काळेची टाकावे यामुळे घरात समृद्धी येते. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments