17 जून शुक्रवार संकष्टी चतुर्थी बाप्पांना नक्की अर्पण करा याची 3 पाने सर्व ईच्छा होतील पूर्ण….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ओम गं गणपतये नमः, भगवान गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्य देणारे आहेत. त्यांची पूजा लवकर फलदायी मानली जाते. असे म्हटले जाते की जो व्यक्ती संकष्टी श्री गणेश चतुर्थीचे व्रत पाळतो.

त्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्याचे सुख आणि सौभाग्य वाढते. यावेळी 17 जून रोजी संकष्टी श्री गणेश चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे.

17 जून शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. मित्रांनो संकष्ट चतुर्थीचे व्रत गणेश यांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी जो भक्त श्री गणेशाची मनोभावे आराधना करतो, विधीवत त्यांची पूजा करतो, पूजा आणि व्रत करतो.

त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर करून त्याच्या सर्व इच्छा श्री गणेश नक्की पूर्ण करतात. आज आपण श्री गणेश पुराणांमध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी असा श्री गणेशाने प्रसन्न करणारा.

आणि आपले जीवनातील दुःख आणि संकट यांचा नाश करून मोठ्या प्रमाणात पैसा आकर्षित करणारा आणि प्रत्येक क्षेत्रात सफलता मिळवून देणारा प्रभावी उपाय बघणार आहोत.

यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि अंघोळ झाल्यावर, सूर्यनारायणाला अर्घ्य घ्यायचे आहे. मग त्यानंतर आपल्या घरातील रोजची देव पूजा करायची आहे,

मात्र यावेळी श्री गणेशांची विशेष पूजा करायचे आहे. तुम्ही जरी हे संकष्ट चतुर्थीचे व्रत उपवास करत असाल तरी सुद्धा या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजन नक्की करा, यासोबतच उपवास केला नसेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता.

आज आपण जो उपाय बघणार आहोत तो आपल्याला श्री गणेश मंदिरात नाही तर त्यांच्या महादेव मंदिरात करायचा आहे. अनेक लोकांना माहित नसेल कि, शिवलिंगावर संपूर्ण शिव परिवार वास करतो.

शिवलिंगावर मध्यभागी महादेव, खालच्या बाजूला माता पार्वती, तर शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर पाणी ज्या बाजूला वाहत जातं त्या दोन्ही बाजूस एका बाजूला कार्तिकेय तर एका बाजूला श्री गणेश वास करतात, तर मित्रांनो शिवलिंगवर ज्या ठिकाणी गणेशाचे स्थान आहे.

त्या ठिकाणी एक वस्तू आज आपण अर्पण करायचे आहे. महादेवाच्या मंदिरात आपण जायचं आहे. दिवसभरात कधीही तुम्ही काय करू शकता मंदिर आज आपण पाच बेलपत्र आणि तीन शमीपत्र घेऊन जायचं आहे.

बेलपत्र हे महादेवांना तर शमीपत्र हे श्रीगणेशांना अत्यंत प्रिय आहे, तर अशी बेलपत्र आणि शमीपत्र घेऊन आपण महादेवांचे मंदिरात जायचे आहे. मंदिरात गेल्यानंतर आपण

त्या ठिकाणी शिवलिंगाच्या समोर एक गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याची मनोभावे पूजन करायचे आहे आणि शिवलिंगावर ज्या ठिकाणी श्रीगणेशाचे स्थान आहे.

त्या ठिकाणी 3 शमीपत्र आपण अर्पण करायचे आहेत, ही शमीपत्र अर्पण करताना “ओम गं गणपतये नमः” या मंत्राचा आपण उच्चं करायचा हे श्रीगणेशाचे ध्यान करायचा आहे.

मग त्यानंतर जे बिल्वपत्र आपण आणलेली आहेत ती शिवलिंगाच्या मध्यभागी एक भाग असतो त्या ठिकाणी पाच बिल्वपत्र “ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय”, मंत्र अर्पण करायचे आहेत.

मग त्यानंतर फुले अर्पण करावीत. मग धूप,दीप नैवेद्य दाखवावा आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोमन प्रार्थना करावी. आपल्या जीवनातील दुःख,संकट यांचा नाश व्हावा ती सुद्धा याच वेळी आपण बोलून दाखवायचे आहे.

विश्वास ठेवा मित्रांनो हा उपाय केल्यानंतर अगदी एक ते दोन महिन्यात तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल. गणेशपुराणात सांगितलेला अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, तुम्ही उपाय नक्की करून पहा.

तुमच्या जीवनातील दुःख, संकट दूर होऊन प्रत्येक कार्यामध्ये सफलता निश्चित मिळेल. विघ्नहर्ता तुमच्या जीवनातील सर्व विघ्न नक्कीच दूर करतील…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!