नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, देवी लक्ष्मी म्हणजेच संपत्तीची देवी. तिच्या कृपेशिवाय माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो.
जीवनात सुख-समृद्धी यावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. जीवनात संपत्ती टिकवून ठेवण्यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव सतत होत राहावा यासाठी लोक प्रयत्न करत असतात.
रात्रंदिवस मेहनत करुनही लक्ष्मी देवतेची कृपा काही लोकांवरच बरसते. जर तुमच्यावरही ल्क्षमी देवीची कृपा व्हावी असे वाटत असेल तर हे पाच उपाय करा. यामुळे देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होईल .
आणि तुमच्यावर धन-धान्याचा वर्षाव होईल. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे आणि पावित्र्याकडे लक्ष देतो.
त्याचप्रमाणे आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोणत्याही अस्वच्छ ठिकाणाहून देवी लक्ष्मी क्रोधित होऊन परतते.
शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष दिवस आहे, असे मानले जाते.
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे परिधान करुन श्रीयंत्राची पूजा करावी. शुक्रवारी श्रीसूक्ताचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप नेहमी स्फटिकाची माळ किंवा कमळाच्या माळेने करावा. हे खूप प्रभावी मानले जाते. या उपायाने मातेची कृपा भक्तावर लवकर होते.
शुक्रवारी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला प्रिय वस्तू दान करा. त्यात शंख, कमळाचे फूल, कवडी इत्यादी हा उपाय केल्याने जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. जर तुम्हाला धनाची देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरुपी वास करु इच्छित असेल,
तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पूजास्थानाची विशेष काळजी घ्यावी लागेल. घराचे पूजेचे स्थान ईशान्य दिशेला असावे आणि पूर्व दिशेला तोंड करुन पूजा करावी.
नियमानुसार श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे ऋग्वेदात सांगितले आहे. असे मानले जाते की शुक्रवारी श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते.
यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते. शास्त्रात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले आहे. असे मानले जाते की देवी लक्ष्मीची कृपा असलेल्या व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धीची कमतरता नसते.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ऋग्वेदात सांगितले आहे की नियमानुसार श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
असे मानले जाते की शुक्रवारी श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments