नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू पंचांगनुसार, कालभैरव जयंती मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान कालभैरवाने अवतार घेतला होता.
धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान कालभैरवाचे वर्णन भगवान शिवाचे उग्र रूप म्हणून केले आहे. भक्तांसाठी कालभैरव दयाळू, परोपकारी आणि लवकर प्रसन्न करणारा मानला जातो.
पण अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा करणारा आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा विधीपूर्वक केली जाते.
धार्मिक श्रद्धा अशी आहे की कालभैरवाची उपासना केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते. असे म्हणतात की कालभैरव चांगले कर्म करणाऱ्यांवर दयाळू असतो, परंतु जो अनैतिक कृत्य करतो तो त्यांच्या क्रोधापासून वाचू शकत नाही.
तसेच भगवान भैरवांच्या भक्तांचे नुकसान करणाऱ्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रय मिळत नाही, असे म्हटले जाते. शास्त्रात कालभैरवचे वाहन कुत्रा मानले गेले आहे. कालभैरवाला प्रसन्न करायचे असेल.
तर त्यांच्या जयंतीदिनी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावे असे म्हणतात. तर जो कोणी या दिवशी मध्यरात्री चतुर्मुखी दिवा लावून भैरव चालिसाचा पाठ करतो, त्याच्या जीवनात राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो.
तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल आणि तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी वाढेल, सुख-समाधान वाढेल तसेच आरोग्य सगळ्यांचे चांगले राहील. तुम्हाला माहीत असेल की, आपल्या घरामध्ये जी काही प्रवेश करीत असते,
मग ते काही वाईट, चांगले असू शकते किंवा अशुभ किंवा अशुभ असू शकते. ते सगळं काही आपल्या मुख्य द्वारातून आपल्या घरात प्रवेश करीत असते.
तर आपल्याला आपल्या मुख्य उंबरठ्यावर ही वस्तू जाळायची आहेत. या दिवशी संध्याकाळी देव पूजा करण्याच्या वेळेस तुम्हाला ही वस्तू तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर जाळायची आहे.
या उपायासाठी तुम्हाला एक म्हणजे कापूर आणि दुसरं म्हणजे लवंग अश्या 2 वस्तू लागतील.
तुम्ही एक वाटी घ्यायचे आहे ती वाटी तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे. जर उंबरठा लाकडाचा असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये कापून ठेवून लवंग जाळू शकता आणि जर उंबरठा लोखंडाचा किंवा फरशी असेल.
तर तुम्ही फरशीवर फक्त कापूर ठेवायचा आणि लवंग जाळू शकता. कारण जर तुमचा उंबरठा लाकडाचा असल्यास तो या उपायाने पेट घेण्याची शक्यता आहे त्यामुळे जर उंबरठा लाकडचा असल्यास हा उपाय एका वाटीमध्ये करावा.
तसेच जर उंबरठा फरशी किंवा लोखंड काही असेल तर तुम्ही डायरेक्ट कापूर ठेवून त्याच्यावर लवंग ठेवली आणि ती जाळली तरी चालेल. तर समजा तुम्ही वाटीमध्ये कापूर ठेवला आणि त्याच्यावर कापूर लावून ठेवायचं आहे .
आणि ते जळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथेच थांबायचं आहे आणि ते जळून झाल्यानंतर ते विजल्यानंतर त्यातलाच जळालेला कापूर किंवा लवंग तुम्ही टाकून द्यायचं आहे.
तर अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे, तर नक्की नवरात्रीचा कोणत्याही तुम्हीसुद्धा हा चमत्कारिक उपाय नक्कीच करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments