9 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी स्थिरतेसाठी हया 3 वस्तू अर्पण करायला विसरू नका…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,अश्विन शुद्ध पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणतात. यंदा 9 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. त्या रात्री लक्ष्मी पूजन करायचे असते व रास-गरबा खेळत रात्रभर जागरण करायचे असते.

त्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते, `कोण जागे आहे?’ जो जागत असेल, त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरदहस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव! हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक जण कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव! जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे, हा त्याचा अर्थ नाही. तसे जागरण तर आपण रोजच करतो.

परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे. अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो.

चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे. ती आपल्याही आयुष्यात यावी, हा चंद्रदर्शनाचा हेतू. आपल्या सभोवताली अशी शांत वृत्तीचे लोक विंâवा संतवृत्तीचे लोक असतील, तर आपण त्यांच्या सहवासात रमतो.

त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. चंद्रदर्शनही असेच विलोभनीय असते. कोजागिरीनिमित्त त्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हे निमित्त! त्यानिमित्ताने खाण्याचे-गाण्याचे कार्यक्रम रंगतात.

चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते. याशिवाय, लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदुळाने हत्ती रेखाटून त्याला हळद-कुंकू वाहिले जाते.

फुले , हार वाहिले जातात. श्रीसुक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हटले जाते. देवीला आणि चंद्राला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. चंद्रकिरणे दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो.

दुधाच्या जोडीला पोह्यांचा बेत ठेवला जातो. पूजा झाली, की देवीचा श्लोक म्हणून पूजेची सांगता केली जाते.

या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदय झाल्यावर आपल्या घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेवर उभे राहा जिथून चंद्र दिसतो. त्यानंतर चंद्राचे स्मरण करून चांदीच्या ताटात ड्राय खजूर आणि काही मकाणे ठेवा.

आणि शुद्ध तुपाच्या दिव्याने तसेच उदबत्तीने ओवाळा. आता दुधाने अर्घ्य द्या. अर्घ्य झाल्यावर पांढरा प्रसाद आणि केशर मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पण करावी. आर्थिक संकट दूर करून समृद्धी प्रदान करण्यासाठी चंद्राला विनंती करा.

नंतर मुलांमध्ये प्रसाद आणि माखणाचे वाटप करा. त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दूध अर्पण करावे. आर्थिक संकट दूर होऊन समृद्धी वाढेल. हा बदल तुम्हाला काही दिवसातच जाणवेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!