घरांत विनाकारण कटकटी, वादविवाद, भांडणे होत असतील,पैसा टिकत नसेल तर करावे हे एक काम….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, स्वामी म्हणतात, ज्या घरात कटकट होतात, भांडण वादविवाद होतात त्या घरात कधीच सुख-समृद्धी राहत नाही. लक्ष्मी माता हे बघून घरातून कायमची निघून जाते, त्यामुळे घरात गरिबी, दारिद्र्यता, अशांती येते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या परिवारावर होत असतो.

आपल्यावर होत असतो. त्यामुळे नाती तुटतात, तसेच काही वेळा माणसे व्यसनाच्या आहारी जातात आणि अजून खूप काही होत असते त्यांच्या घरात नकारात्मक वातावरण तयार होत असते.

म्हणून तुमच्या घरातही छोट्या-मोठ्या कटकटी होत असतील किंवा भांडणे होत असतील, वाद-विवाद होत असल्यास, नात्यात दुरावा असेल तर यासाठी काय करावे आता सगळ्यांच्याच प्रश्न असतो.

तर काही अडचणी, दोष, पीडा किंवा काही ग्रह दोष असल्यामुळे सुद्धा असे होत असते किंवा आपण ज्या घरात राहतो त्या घरात वास्तुदोष असल्याने असे होत असते.
त्यासाठी एक उपाय सांगितला गेला आहे हा उपाय तुम्ही नक्की आपल्या घरात करा.

यांनी लगेचच फायदा मिळायला सुरुवात होते. कारण घरात विनाकारण कटकट होत असेल, भांडणे होत असल्यास, तसेच घरातील स्त्री नाराज राहत असेल तर थोडी हळद घ्यावी व थोडे गोमूत्र घ्यावे.

यांना दोघांना मिक्स करून घ्यावे, मग हळद आणि गोमूत्र हे मिश्रण संपूर्ण घरात शिंपडावे. यामध्ये हळद यासाठी की यामुळे दोष दूर होतात आणि वाईट शक्ती घरात राहत नाही.

त्या हळदीमुळे दूर पळतात. पीडा नाश होतात आणि गोमूत्र यासाठी की, जेव्हा आपल्या घरातून वाईट शक्ती निघून जातात तेव्हा सकारात्मक गोष्टी येतात तेव्हाही गोमूत्र घराला पवित्र करते, त्यामुळे म्हणून हळद

आणि गोमूत्र काही दिवस लगातार न चुकता उपाय करावा किंवा तुम्हाला जमत नसेल तर आठवड्यातून दर शनिवारी तरी हा उपाय करावा, त्यांनी नक्कीच तुमच्या घरात फरक जाणवेल आणि कधी जर फरक जाणवणार नाही.

तर मग एखादी शुभ दिवस बघून 5 सुवासिनी महिलांना बोलावून त्यांच्या मानपान करावा. दूध खीरचा नैवेद्य दाखवावा, यांनी माता लक्ष्मी प्रसन्न होते.लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आपल्या परिवारावर अन आपल्यावर होते आणि तरीही कोणता त्रास कटकटी भांडण होणार नाही.

तर हे दोन छोटे उपाय आहे, उपाय पहिला हळद मिक्स करून घरात शिंपडल्याने नक्कीच घरातल्या वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती इडा पिडा असतात दोष असतात ते नक्कीच दूर होतात. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा…

याशिवाय जर आपल्याला अनेक अडचणी येत असतात, दु:ख, भिती, चिंता,काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटुन असते, काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही.

अशावेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरीता हे उपाय करून पाहा…

यामध्ये सर्वप्रथम, दररोज घरात श्री सूक्त पठन केले असता, त्या घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबिनमधे तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेश द्वारावर बांधल्यास घरात सुखशांति व धनाची वाढ होते.

प्रत्येक गुरुवारी तूळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो.तसेच ज्या घरात एक तरी भक्तीवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटूंबीय केवळ त्याच्यामुळे तरून जातात.

ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटूंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते, शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमीत बोला, किंवा रेकॉर्डींग सुरू ठेवा….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!