27 किलो वजन आपोआप कमी होईल, ना व्यायाम, ना औषध. फक्त आणि फक्त हे 3 नियम तंतोतंत पाला….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, जर तुम्ही देखील आळशी लोकांपैकी एक असाल आणि वजन कमी करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला फिट राहण्यास आणि कॅलरी बर्न करण्यात नक्कीच मदत होईल.

वजन कमी करणे सोपे काम नाही. यासाठी मेहनत घ्यावी लागते. कोणाच्याही जीवनातील वजन कमी करण्याच्या प्रवासावर एक नजर टाका, प्रत्येकाने जिममध्ये खूप घाम गाळलेला असेल.

दुसरे म्हणजे, वजन कमी करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. अर्थात, जिममध्ये तासनतास घाम गाळण्याबरोबरच महागडा डाएट प्लॅन फॉलो करणं प्रत्येकाला जमणारं काम नसतं. काही लोक आळशी असतात जे या दोन्ही गोष्टींपासून दूर पळतात.

ज्यांना वजन तर कमी करायचं असतं पण मेहनत करायची नसते. अशावेळी प्रश्न पडतो की जिम आणि डाएटशिवाय वजन कमी करण्याचे साधेसोपे साधन काय असू शकते?

जर तुम्ही देखील या आळशी लोकांपैकी एक असाल आणि वजन कमी करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी मार्ग सांगणार आहोत ज्याची तुम्हाला फिट राहण्यास आणि कॅलरी बर्न करण्यात नक्कीच मदत होईल.

सगळ्यात उत्तम म्हणजे यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही झोपूनही हे करू शकता आणि ते उपाय झोपेतही कॅलरी जलद बर्न करू शकतात.
आजचा उपाय हा चमत्कारिक उपाय असून,

यामुळे तब्बल 27 किलोपर्यंत वजन कमी झालेले आहे ते पण कोणताही व्यायाम न करता आणि कोणत्याही प्रकारचे औषध न घेता वजन कमी झाले आहेत. तरी असा हा कोणता उपाय आहे त्यातील सर्व बाबी जाणून घेण्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

आपले वजन हे काही एक दिवसात वाढत नाही, ते हळूहळू वाढत असते. त्यामुळे या वजन वाढण्यामागे अनेक कारणे असतात. त्यामुळे आपल्याला वजन कमी करायचं असेल तर ही कारणे जाणून घेऊन ती कारणे कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.

तसेच आपण नेहमी तरुण व आपले शरीर खूप चांगले राहण्यासाठी हे वाढलेलं वजन आणि साठलेली चरबी कमी करणे गरजेचे असते. जर आपण झटपट वजन कमी केले तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

त्यामुळे आजचा जो उपाय आहे त्याचे नाव फ्लेचरीजम आहे.1898 अमेरिकेत राहणाऱ्या होरेष्ठ फ्लेचर या व्यक्तीने हा उपाय शोधला. त्यामुळे या उपायाचे नाव फ्लेचरीजम पडले. कारण या व्यक्तीला वयाच्या 40 व्या वर्षीच म्हातारपण आले होते आणि त्याचे वजन आवश्यकतेपेक्षा जवळजवळ 25 किलो जास्त होते आणि

हे वजन वाढल्यामुळे त्याला सतत अपचन आणि गॅससे व्हायचे. त्याचप्रमाणे नेहमी थकवा आणि सर्दी व्हायची, तसेच दम लागायचा अशा अनेक रोगाने त्रस्त झाला होता म्हणून त्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याने वजन कमी करण्यासाठी एक पद्धतशीर नियम तयार केले आणि त्या नियमांचे पालन केले. त्याचे वजन एक महिन्यात 7 किलो असे 4 महिन्यांमध्ये 27 किलो कमी झाले.

असा हा परिणामकारक उपाय आहे. यासाठी कुठलाही व्यायाम करायची गरज नाही किंवा कोणतेही औषध घ्यावे लागत नाही. याचबरोबर, कुठलाही प्रकारचा आसन करावे लागत नाही पण एक गोष्ट अशी की, याची पद्धती होती ती आपल्या आयुर्वेदात फार जुन्या काळापासून आहेत.

मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या लोकांना खरच वजन कमी करायचे त्यांनी आहारातून पांढरे पदार्थ कमी करावेत. पांढर पदार्थ म्हणजे मीठ, मैदा, साखर, भात आणि तीळ यांचे प्रमाण तुम्ही आहारातून खूप कमी करायला पाहिजे किंवा याचा वापर कमीत कमी व्हायला पाहिजे.

आता हे कोणते ते थोडक्यात पाहू या. यामध्ये पहिला नियम म्हणजे, जेवतांना प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा किंवा हा घास चावून चावून इतका पातळ करा की तो पाण्यासारखा सहज घेता आला पाहिजे.

त्यामुळे अपचन मुळापासून नष्ट होते आणि पोट साफ होते आणि पचनाचा वेग वाढतो. त्यामुळे शरीरात चरबी साचत नाही व साचलेली चरबी हळूहळू विरून जाते आणि हळूहळू वजन कमी लागते.

आता दुसरा नियम आहे तो म्हणजे भूक लागल्याशिवाय जेवू नका. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. कारण भूक नसतांना जर आपण जेवण केलं तर ते अन्न शरीरात चरबीच्या स्वरूपात साठवलेले जाते, आणि आपल्या शरीराची चरबी वाढते आणि वजन प्रमाण वाढण्यास मदत होते.

त्यामुळे जर आपण भूक लागली तेव्हाच अन्न पचत आणि शरीरात मेद स्वरूपात साचत नाही आणि चरबी वाढत नाही.

यातील तिसरा आणि शेवटचा उपाय म्हणजे, थकवा किंवा चिंता काळजी अशा गोष्टी तुमच्या मनात असतील तर तुम्ही जेवण करू नका. त्याचप्रमाणे जेवतांना जे विषय आपल्याला आवडत नाहीत यावर बोलू देखील नका.

यामुळे अन्नावर परिणाम होतात ते अन्न पचत नाही, आणि ते अन्न मेदाच्या स्वरूपात शरीरात राहते. त्यामुळे आपल्याला शांत वातावरण प्रसन्न वातावरणात जेवण करायचा आहे.

तसे हे अगदी 3 सोपे नियम पाळले तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होणार आहे. यात महत्त्वाची गोष्ट अशी की या नियमांचे तंतोतंत रोजच्या रोज आणि प्रत्येक जेवणाच्या वेळेस पालन झाले पाहिजे अन्यथा तुम्हाला योग्य परिणाम मिळणार नाही.

हा चमत्कारिक उपाय आहे करून तुम्हाला नक्की परिणाम मिळेल..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!