16 जुलै, शनिवारी, संकष्टी चतुर्थी, बाप्पांच्या पुढे ठेवा हे 1 फुल, इच्छा ताबडतोब पूर्ण होईल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 16 जुलै, शनिदेवाच्या दिवशी रोजी आली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. या दिवशी भाविक विधीनुसार गणपतीची पूजा करतात.

असे केल्याने भक्तांचे सर्व दु:ख दूर होतात असे मानले जाते. दर महिन्याला पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तर अमावस्या नंतरच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.

या दिवशी अनेकजण उपवास करतात, गणेशाला दुर्वा अर्पण करा. 16 जुलै 2022 रोजी, शनिवारी म्हणजेच संकष्टी चतुर्थी हा सण आहे. संकष्ट म्हणजे दुःख किंवा आपत्ती. शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

या दिवशी माता गणेश चौथचा उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि दुःख दूर करण्यासाठी देवाची प्रार्थना करतात. संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन उपवासाची सांगता केली जाते.

असे मानले जाते की, जो कोणी या दिवशी पूर्ण भक्तिभावाने गणपतीची पूजा करतो, त्याला त्याच्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. ही तारीख खूप खास आहे. या तिथीला गणेशाची आराधना केल्याने प्रत्येक कामात यश मिळते आणि संकट दूर होतात.

धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात. भगवान गणेशाला शास्त्रात विघ्नहर्ता असेही म्हटले आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसणे शुभ असते असे म्हणतात.

चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच हे व्रत पूर्ण मानले जाते. स्नान आवरून देवघरातील गणेशाची 21 दुर्वा वाहून पूजा करा व त्यानंतर हा मंत्र जप करा.

|| ओम वक्रतुंडाय हूं || या मंत्राचा जप हकीकची माळ जी असते, किंवा आपली पोवळ्याची माळ असेल आणि जर कोणतीच नसेल तर मोजून धान्य घ्या व मनापासून जप करा व भगवान गणेशाला प्रार्थना करा की तुमच्या विवाहातील अडचणी दूर होऊदेत.

सर्व काही निर्विघ्न पार पडू देत. जर घरातील महिला थोडं चीडचीड करत असतील, तर हा एक उपाय करा, आपली पत्नी नाराज असेल तर , संसार नीट नसेल, प्रेयसी नाराज असेल तर ओम वक्रतुंडाय हूं या मंत्राचा जप या माळेवरती करा.

जर आपल्याला शत्रूपिडा असेल तर कडुलिंबाच्या झाडापासून ज्या गणेश मूर्ती बनवल्या जातात त्या स्थापन करून पूजन मर, शत्रू शांत होतात. घरातील गरिबी, दारिद्र्य घालवण्यासाठी गणेशाच्या अर्क काष्ठ प्रतिमेचे पूजन करावे.

त्यामुळे घरातील ऐश्वर्य पुन्हा येते, सुख, शांती येते. बाप्पांना लाल जास्वंदी फुले प्रिय आहेत, तसेच लाल फुले देखील प्रिय आहेत ती अर्पण करावीत. जवळच्या शेतातील किंवा जिथे स्वछता आहे.

अशा ठिकाणची माती आणा व स्वतः ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करत मूर्ती बनवा, ही मूर्ती तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त करण्यास मदत करते व यशदायी असते.

या मूर्तीला पार्थिव मूर्ती म्हणतात व ती मूर्ती सिद्धी प्राप्त करून देते. अशा मूर्तीची या दिवशी पूजा करा. खूप साऱ्या अडचणी, बाधा जर येत असतील तर तुम्ही हा उपाय करा, 21 माळा जप करा, म्हणजे 21 वेळा एक एक माळ जप करावा, त्यासाठी या मंत्राचा जप करा,

||ओम गं गौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा || मोठ्यात मोठी अडचण दूर होते. कुंभार जी मूर्ती बनवतो तिथे जाऊन त्याच्या चाकाची माती घेऊन स्वतः एक गणेशाची प्रतिमा बनवा ,

यावेळी स्थापना करताना 108 माळा म्हणजेच 108 मण्यांची एक माळ व अशा 108 माळा जप या मंत्राचा करावा.

|| ॐ गणेश महालक्ष्यै नम: || हा सिद्ध मंत्रजप केल्यास तुमच्या क्षेत्रात भरपूर यश व सिद्धी मिळतील. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील तसेच कामात ज्या अडचणी होत्या त्या सर्व दूर होतील.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!