9 ऑक्टोबर, कोजागिरी पौर्णिमा सकाळी बोला हा 1 मंत्र, लक्ष्मी घरात येईल, धन प्राप्ती होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,अश्विन शुद्ध पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणतात. यंदा 9 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. त्या रात्री लक्ष्मी पूजन करायचे असते व रास-गरबा खेळत रात्रभर जागरण करायचे असते.

त्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते, `कोण जागे आहे?’ जो जागत असेल, त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरदहस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव! हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक जण कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव! जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे, हा त्याचा अर्थ नाही. तसे जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे.

अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो.

संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो.

चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे. ती आपल्याही आयुष्यात यावी, हा चंद्रदर्शनाचा हेतू. आपल्या सभोवताली अशी शांत वृत्तीचे लोक विंâवा संतवृत्तीचे लोक असतील, तर आपण त्यांच्या सहवासात रमतो.

त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. चंद्रदर्शनही असेच विलोभनीय असते. कोजागिरीनिमित्त त्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हे निमित्त! त्यानिमित्ताने खाण्याचे-गाण्याचे कार्यक्रम रंगतात. चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते.

यासाठी आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर, कोणतेही काम न करता सगळ्यात आधी हे काम करायचा आहे. पण तुम्ही सकाळी उठल्यावर आंघोळ करून आणि काहीच न खाता, न पिता तुम्हाला सगळ्यात आधी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे.

आणि नमस्कार करायचा आहे, हे पहिलं काम आहे आणि त्यानंतर सूर्यदेव प्रार्थना केल्यानंतर तुम्ही अर्घ्य किंवा जल अर्पित केले नाही,तरी सुद्धा केलं तरी तुम्ही सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्य देवाला नमस्कार करावा.

मग नमस्कार करून झाल्यावर, सगळ्यात मुख्य काम करायचा आहे. ते विशेष काम म्हणजे ते तांब्याभर पाणी घ्या आणि ते पाणी तुळशीमध्ये टाका.मग त्यानंतर तुळशीमध्ये टाकताना,

तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र 11 वेळा तुम्हाला बोलायचा आहे.हा चमत्कारिक मंत्र काही असा आहे की, “ओम विष्णुप्रियाय नमः” “ओम विष्णुप्रियाय नमः”

तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र तुम्हाला रोज सकाळी बोलायचा आहे. सगळ्यात आधी सूर्याला नमस्कार करायचा मग त्यानंतर माता तुळशीमध्ये पाणी टाकताना हा मंत्र बोलायचं आहे.

हे काम तुम्हाला दसऱ्यापासून दुसऱ्या दिवसापासून सुरू करायचे आहे आणि ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करायचे आहे आणि याशिवाय तुम्हाला शक्य असल्यास,

कोजागिरी पौर्णिमेपर्यंत न करता तुम्ही कायम स्वरूपी दिवाळीपर्यंत किंवा एक-दोन महिने किंवा कायमस्वरूपी सुद्धा केलं तरी आणि लाभ तुम्हालाच होणार आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!