होळीच्या दिवशी करू नका या चुका, नाहीतर घर बरबाद होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी होय. संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. होळी हा सण रंगाचा असल्यामुळे लहान मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचते.

साधारणता फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रपूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्यात दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे.

देशात होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असलं तरी हिंदू शास्त्रात होळीतील भस्माला मात्र विशेष महत्त्व आहे. या सणाशी निगडीत बऱ्याच समजुती आणि प्रथा आहेत.

होळीतल्या भस्मामुळे अनेक दोष दूर होतात अशी मान्यता ही आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरा केल्याने त्याचे चांगले फळ मिळते, त्यामुळे या काही विशेष गोष्टीं केल्यास त्यांचे शुभफल प्राप्त होते.

होळी सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी आणि भगवान श्रीहरी विष्णूचा नृरसिंह अवताराची पूजा करावी. असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते आणि तसं होळी दहना वेळीसुद्धा अवश्य सहभागी व्हावं.

काही कारणास्तव होळी दहनाच्या दिवशी आपण तिथे उपस्थित राहणं शक्य नसेल, तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात. होळीमध्ये जवस, वाटाणा, गहू किंवा हरभऱ्याच्या जोड्या यांपैकी जे तुमच्याकडे असेल,

होळीच्या आगीत भाजून प्रसादाच्या स्वरूपातील सर्वांना वाटावं. होळीतील भस्म पुरुषांनी मस्तकावर लावावा आणि स्त्रियांनी गळ्याभोवती लावावं. त्यामुळे समाजात कीर्ति वाढते आणि संपत्तीतही वाढ होते, असा समज आहे.

होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि केळ तसेच तीळ काळ्या कपड्यात बांधून होळी टाका, असं केल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो.

दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण आपण साजरा करतो. या फाल्गुन पौर्णिमेस आपण रात्री एक छोटासा उपाय अवश्य करून पहा. आपल्यावरती माता लक्ष्मीची असीम कृपा नक्की बरसेल.

होळी दहन हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. शुभ मुहूर्तावर होळी दहनाची पूजा करणे फार महत्वाचे मानले जाते, कारण शुभ मुहूर्तावर केलेले कार्य शुभ फल देते.

होळीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. होळी दहनाच्या दिवशी काही काम करणे अशुभ मानले जाते. अशा परिस्थितीत होळी दहनाच्या दिवशी काय करू नये हे आपल्याला माहिती आहे.

होळी दहनाचे अग्नि हे जळत्या चितेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नवविवाहित जोडप्यांनी होळी दहनाचा अग्नी पेटताना पाहू नये. वास्तविक असे करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने वैवाहिक जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते असे मानले जाते.

होळी दहनाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला उधार देऊ नये. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येत नाही. यासोबतच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आई-वडिलांच्या एकुलत्या एक मुलाचा होलिकेत बळी देऊ नये.

वास्तविक ते अशुभ मानले जाते. जर तुम्हाला दोन मुले असतील तर तुम्ही होळीचा अग्नी पेटवू शकता. होळीच्या अग्नीत विसरुनही पिंपळ, वट आणि आंब्याचे लाकूड वापरू नये. कारण असे केल्याने जीवनात नकारात्मकता येते.

होळी दहनासाठी गुलार आणि एरंडीचे लाकूड शुभ मानले जाते. होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणत्याही महिलेचा अपमान होता कामा नये. या दिवशी आई-वडिलांचा आशीर्वाद अवश्य घ्यावा. असे केल्याने भगवान श्रीकृष्णाची कृपा कायम राहते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!