नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू धर्मशास्त्रामध्ये दानाचे खूप मोठे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की , दानधर्म केल्याने पुण्य प्राप्त होते. दानधर्म करताना आपण ज्या वस्तू दान करत असतो त्या दान केलेल्या वस्तू पेक्षा कितीतरी पुण्य व चांगल्या गोष्टी भगवंत आपल्याला देत असतो.
परंतु दान कर्म चांगले असले तरी अशा काही वस्तू आहेत. या वस्तूंचे कधीच दान केले गेले नाही पाहीजे, त्यामुळे या वस्तू कोणालाही दान म्हणून देऊ नका. खास करून संध्याकाळी व सूर्यास्तानंतर या वस्तू कोणालाही दान व उधार म्हणून देऊ नका.
बऱ्याचदा आपल्या जवळची माणसे व शेजारची सूर्यास्तानंतर या वस्तू आपल्याकडून मागू शकतात. लक्षात ठेवा सूर्यास्त झाल्यानंतर या पाच वस्तू काही झाले तरी कुणाला दान म्हणून देऊ नका.
या 4 वस्तू दान म्हणून दिल्याने आपल्या घरातील बरकत निघून जाते. घरातील धना मध्ये कमतरता निर्माण होते जर तुम्ही वारंवार या वस्तूचे दान केल्यास तुमच्या घरामध्ये आर्थिक तंगी निर्माण होऊ शकते.
आणि घराची बरकत पुन्हा कधीच होत नाही . चला तर मग जाणून घेऊया त्या 4 वस्तू नेमक्या कोणकोणत्या आहेत.
त्यातील पहिली वस्तू आहे लसूण आणि कांदा. अनेकांना आश्चर्य वाटेल की, कांदा व लसुन दिल्याने नेमका असा कोणता तोटा होतो. लसूण आणि कांदा यांचा थेट संबंध केतु ग्रहाशी आहे.
जो जादूटोणाशी संबंध असतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असू शकतात जे आपल्याला कांदा व लसुन यांचा वापर करून त्रास देऊ शकतात आपल्यावर अनेक चुकीच्या गोष्टी लादू शकतात आणि म्हणूनच सूर्यास्तानंतर कुणालाच लसूण कांदा उधार व दान म्हणून देऊ नका.
सुर्यास्तानंतर लसूण कांदा कुणाला उधार देणे हे हिंदू धर्मशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. दुसरी वस्तू म्हणजे ती आहे हळद. अनेकांना माहिती असेल की, हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी असतो.
त्याशिवाय हळदीला लक्ष्मीचे स्वरूप सुद्धा मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये गुरू ग्रह बलवान असतो त्या व्यक्तीच्या नशिबामध्ये अपार धनसंपत्ती येत असते म्हणून अशा व्यक्तीने संध्याकाळी हळदी चे दान करणे चुकीचे मानले जाते.
कारण की असे केल्यामुळे त्यांच्या कुंडलीतील बलवान ग्रह गुरु कमजोर बनू शकतो.
गुरु ग्रह कमजोर झाल्यामुळे आपल्या घरात पैशाची चणचण निर्माण होऊ लागते. पैशाच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे संध्याकाळी चुकून सुद्धा कुणाला हळद देऊ नका.
तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे पैसा व मौल्यवान वस्तू जसे की सूर्यास्त झाल्यानंतर कुणालाच पैसा व मौल्यवान वस्तू म्हणजे सोने-चांदी इत्यादी वस्तू कुणालाही दान व उधार देऊ नका.
आपण पैशांना व मौल्यवान वस्तूंना माता महालक्ष्म यांचा दर्जा देत असतो. आपण संध्याकाळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवत असतो. संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते.
म्हणूनच संध्याकाळी तुम्ही कोणाला पैसे व मौल्यवान वस्तू दिल्यास माता महालक्ष्मी आपल्यावर रागावू शकते त्यामुळे संध्याकाळी चुकून सुद्धा कुणाला पैसे देऊ नका.
याचबरोबर, दह्याचा संबंध हा शुक्र ग्रह असतो.
दही आपल्याला सुख-समृद्धी प्रदान करतोय हिंदू धर्मशास्त्रात असा उल्लेख सुद्धा आहे म्हणून सूर्यास्तानंतर दही कुणाला देऊ नका म्हणून संध्याकाळी दहयाचे दान कुणाला करू नका. जी व्यक्ती संध्याकाळी कुणाला दही देते.
त्या व्यक्तीच्या आयुष्यातून सुख व संपत्ती निघून जाते. शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे वस्तू म्हणजे दूध. अनेकांना आश्चर्य वाटेल परंतु दुधाचा संबंध थेट भगवान सूर्य देव व चंद्र देव यांच्याशी आहे.
भगवान विष्णू माता महालक्ष्मी यांच्याशी सुद्धा दुधाचा संबंध आहे म्हणूनच सायंकाळी व सूर्यास्तानंतर चुकून सुद्धा दुधाचे दान करू नका म्हणूनच आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल की सायंकाळी व सूर्यास्तानंतर कोणकोणत्या वस्तूचे दान करू नये.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments