या दिवशी माचिसचे दान, पिढ्यानपिढ्याची गरिबी नष्ट होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,दानाचे महत्त्व आपण सगळेच जण जाणतो. परंतु कधी परिस्थिती अभावी, तर कधी वेळेअभावी आपल्याकडून दान दिले जात नाही. दान देण्यासाठी आर्थिक श्रीमंती बरोबर मनाची श्रीमंती सुद्धा असावी लागते. दातृत्त्वाचा गुण अंगी असावा लागतो.

शास्त्र आणि पुराणात लिहिलेले आहे आणि आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांच्या तोंडून हे ऐकत आलो आहोत की आपण आपल्या कमाईचा काही भाग दानातही खर्च करावा.

असे केल्याने त्यांना केवळ या जन्मामध्ये चांगल्या कर्मांची गुणवत्ता मिळते असे नाही तर ते स्वत: साठी परलोकातही चांगले स्थान मिळवतात. परंतु आपल्याला कोणत्या गोष्टी दान कराव्या लागतात.

आणि त्याने कोणते लाभ होतात, याचबरोबर माचीस पेटी कोणत्या दिवशी दान करावी? याबद्दल बर्‍याच वेळा माहित नसते. त्यामुळे असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात.
यामध्ये सोमवार भगवान शिव आणि चंद्राशी संबंधित असल्याचे मानले जाते.

यादिवशी पांढर्‍या गोष्टी दान करण्याला अत्यंत महत्व आहे. या दिवशी आपण इच्छित असल्यास आपण तांदूळ, पांढरे कपडे, पांढरे फुलझाडे आणि साखर-नारळ दान करू शकता. असे केल्याने शिवांच्या विशेष कृपेने चंद्रही बळकट होतो.

मंगळवारी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. मंगळवारी लाल फुले, लाल चंदन, लाल कपडे, बदाम आणि तांब्याची भांडी आणि माचीस दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

मंगळवारी दान केल्याने आपले मंगळ बळकट होत असताना संकटमोचन बजरंगबलीची कृपा आपल्याला लाभते. आपल्या सर्वांच्या करियरसाठी बुधवारी दान करणे फायद्याचे आहे.

बुधवारी हिरव्या गोष्टींचे दान करणे सर्वात शुभ मानले जाते. या दिवशी विवाहित महिलांनी गरजूंना हिरवे मूग, हिरव्या रंगाची माचीस किंवा हिरव्या बांगड्या दान करू शकता.

याचबरोबर, हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस सर्व देवींना समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी आणि संतोषी मातेची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा-अर्चा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

शुक्रवारी दान वगैरेचेही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी दान केल्याने केवळ सुख आणि समृद्धी मिळत नाही तर शुक्र ग्रहाला बळ मिळते. ज्योतिषी सांगतात की जर मुलांच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असेल तर त्यांचे लग्न लवकर होते.

तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. शुक्रवारी या वस्तूंचे दान केल्यास फळ मिळते. शुक्रवारी माचीसचे वस्तूंचे दान करा. याशिवाय, विवाहित महिलांना शुक्रवारी लाल रंगाचा श्रृंगार करून बांगड्या, साडी, सिंदूर, कुंकुम इत्यादी दान करा.

असे केल्याने मां लक्ष्मी प्रसन्न होते. एवढेच नाही तर जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

तसेच या दिवशी गरीब आणि गरजूंना जुनी पुस्तके किंवा जुने जोडे इत्यादी दिल्याने शुभ होते. या दिवशी मीठ दान केल्याने शुक्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. असे मानले जाते की, शुक्रवारी रेशमी कपडे, जुनी चादर इत्यादी वस्तू दान केल्याने घरात आनंदाचे वातावरण राहते.

तसेच वैवाहिक जीवनात गोडवा येतो. शुक्रवारी विधवेला पांढरे वस्त्र दान केल्याने सौभाग्य प्राप्त होते. वास्तूनुसार घरात कचरा ठेवू नये. शुक्रवारी रद्दी पेपर कोणत्याही गरजूला मोफत द्या. असे केल्याने लक्ष्मीही प्रसन्न होते.

कारण धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा-अर्चा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. यासह जीवनात सुख समृद्धीचे आगमन होते. शुक्रवारी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने माता लक्ष्मीला प्रसन्न केले जाऊ शकते. शुक्रवारी दान केल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो. जर शुक्र ग्रह कुमकुवत असेल तर विवाहसंबंधी अडचणी निर्माण होतात.

त्यामुळे कुंडलीतील शुक्र मजबूत करण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. वास्तू शास्त्रानुसार शुक्रवारी घरात रद्दी ठेवू नये. शुक्रवारी रद्दी तसेच जुने कागद गरजूंना दान करावे.

यासह या दिवशी रेश्मी कपडे, जुन्या चादर आदी वस्तूंचे दान केल्याने सुख शांती लाभते. यासह दाम्पत्य जीवन सुखी होते. शुक्रवारी मिठाचे दान केल्याने शुक्र ग्रहसंबंधी दोष दूर होतो. त्यामुळे शुक्रवारी गरीब आणि गरजुंना मीठ दान करावे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!