स्वामी सेवा करुनही जर स्वामी प्रसन्न होत नसतील, इच्छा अपूर्ण असतील, तर करा हा पर्याय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपण नियमितपणे स्वामींची पूजा करतो त्यांचा नामजप करत होतो त्यांचा मंत्र जाप करतो आणि जे करणं शक्य असत ते सर्व करतो.

तरीही श्री स्वामी समर्थ महाराज  आपल्याला प्रसन्न होत नाहीत, मग अशा वेळी स्वामींच्या मुर्ती कडे किंवा फोटोकडे बघत तुम्ही आपण विशेष लक्ष त्याकडे बघत ही गोष्ट करावी.

आपण स्वामींची पुजा करीत असताना, आपण हे सर्व मनापासून केले पाहिजे, कारण हे सर्व कामे करतांना स्वामी आपल्या भक्तांची काळजी घेत असतात त्याला कोणताही त्रास होऊ देत नाही.

तर मग आपण पण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तसेच नेहमी स्वामींचा विचार करा.

स्वामींना आपल्या कडून काय पाहिजे याचा विचार करा, त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपण करायला पाहिजे जेणेकरून स्वामी खुश होतील व इच्छा पूर्ण करतील.

आणि आपल्याला पाहिजे ते सर्व स्वामी आपल्याला मिळवून देतील. पण एक गोष्ट लक्षात ठेव की, स्वामींच्या ना आवडीच्या गोष्टी अजिबात करू नका, नाहीतर स्वामी रागाला जातील.

तसेच आपल्या चुकीची आपल्याला जाणीव करून देतील. तसेच शिक्षा सुद्धा देतील, त्यामुळे नेहमी स्वामींची पूजा करत असताना स्वामी समर्थ महाराजाना अष्ट गंध लावावा.

कारण स्वामींना अष्टगंध खूप आवडतो, काही लोक स्वामींना हळदी-कुंकू लावतात, त्यामुळे स्वामींना हळदीकुंकू अजिबात आवडत नाहीत, त्यामुळे तुम्ही स्वामींना हळदकुंकू लावण्याची चुक अजिबात करू नका.

तसेच तुम्ही स्वामींचा मंत्रजप करताना स्वामींच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे बघावे. कारण काही जणांना सवय असते की, मंत्राचा जप डोळे झाकून करण्याची काही लोकांना सवय असते.

मात्र एवढी सुंदर मूर्ती समोर असताना तुम्ही डोळे बंद करून कधीही मंत्रजप करू नये. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वामींना नैवेद्य दाखवत असताना तसाच नैवेद्य कधीही दाखवू नका, त्यावर नेहमी तुळशीचे पानं नक्की ठेवा नाहीतर स्वामी तसाच कधी स्वीकारत नाहीत.

त्यामुळे तुम्ही तुळशीपत्र नेहमी त्यावर ठेवत जा. तसेच स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो.

स्वामींची मुर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी.

यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की, स्वामींची मुर्ती घरात ठेऊ नये. कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो, दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते.

याशिवाय रोज नैवेद्य आरती करावी लागते. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत.

आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्विकारतात.

गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपूऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावनाच चूकीची आहे.

तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भिती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामींची पूजा, भक्ति व सेवा करावी.

या सेवेमुळे तुम्ही ही सर्व काम पूर्ण इच्छा ठेवून करत जा आणि ही काम या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!